‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर..’; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना डिवचलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराला मंत्रिपद देऊ असं सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर आहेत ते आमदारही निघूण जातील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अवकाळी पावसानं राज्याचं वाटोळं केलं आहे. निसर्ग कधी कोपलं सांगता येत नाही, अशा वेळी आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे याबद्दल तर हे लोक बोलायला तयार नाहीत. अशा पद्धतीचं सरकार आज सत्तेत आलेलं आहे. त्यांना याबाबत विचारलं ते फक्त म्हणतात आम्ही करू, आम्ही देऊ काही काळजी करू नका. परंतू तशा पद्धतीचा निर्णय काही होत नाही, असंही अजित पवार म्हणाले.