ताज्या घडामोडीमुंबई

दोन वर्षांनंतर राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळत आहे;

मुंबई | दरवर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे याला कृष्ण पंचमीदेखील म्हणतात. या दिवशी राधा-कृष्ण आणि इतर देवी देवतांनाही गुलाल व रंग लावून रंगपंचमी खेळली जाते. गेली दोन वर्ष देशभरात सर्व सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. मात्र आता रुग्णसंख्या बरीचशी कमी झाल्यामुळे आज दोन वर्षांनंतर देशभरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

रंगपंचमीचा दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. हा दिवस धनदायकही मानला जातो, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. असे म्हणतात, या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करते वेळी गुलाबाच्या फुलांचा हार, दोन वात असलेला दिवा आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे.

महाराष्ट्रात रंगपंचमीच्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरून मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच मासेमारी करणाऱ्या समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button