breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करु नये, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन वेगवेळ्या स्वरूपातील आंदोलन करताना दिसून आले आहेत. एसटी कर्मचार्‍यांनी संप केल्यानंतर राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या. परंतु एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा राज्य सरकारमध्ये सहभाग करून राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना लागू होणार्‍या सर्व सुविधा मिळाव्यात ही मागणी घेऊन कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करू नये ही मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात जनतेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचार्‍यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्‍वासन न मिळाल्याने एसटी कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांत काम ठप्प आहे.

ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचार्‍यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करुन कर्मचार्‍यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे. एसटी कर्मचार्‍यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचार्‍यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचार्‍यांच्या मनात निर्माण झालेला अविश्‍वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचार्‍यांत असंतोषाचा भडका उडाला आहे.

एसटी कर्मचारी-कामगार जगला तरच एसटी जगेल हे भान बाळगण्याची माझी आपणाला विनंती आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई करु नये, अन्यथा कर्मचार्‍यांत असंतोषाचा उद्रेक होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button