पिंपरी-चिंचवडमध्ये दर महिन्याला भरणार पोलिसांचा जनता दरबार
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा. अशी सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी पिंपरी मध भेट दिली असताना केली आहे.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रश्नासंदर्भात पोलीस आढावा बैठक शनिवारी घेतली. या बैठकीनंतर ते
पत्रकारांशी बोलत होते.
पिंपरी – चिंचवड शहरातील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राजरोसपणे खून होत आहेत. ऑनर किलिंगसारखे प्रकार देखील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झाल्याचे दिसून आले आहे. दिवसाढवळ्या शहरातील नागरिकांची वाहने लंपास होतात. मात्र यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही अशी परिस्थिती आहे अशा या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठीगुन्हेगारांचा बंदोबस्त करावा. पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा,पोलिसांबद्दल नागरिकांचे चांगले मत व्हावे, नागरिकांचे प्रश्न सुटावेतयासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीसनिरीक्षकाने महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा. याची तारीख नागरिकांनाअगोदर कळविण्यात यावी. नागरिकांनी आपल्या प्रश्नांसंदर्भात पोलीसांना आधीकाही दिवस अर्ज द्यावा. जेणेकरून प्रश्न सोडविण्यास सोपे होईल. तसेच
त्यांच्या प्रश्नांचे निराकारण होण्यास मदत होईल. जनता दरबारामुळेनागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक चांगला दृढ विश्वास निर्माण होईल, असेहीगृहमंत्री पाटील म्हणाले.
दरम्यान राज्यात पहिल्या टप्यात ५ हजार २००
पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी आयुक्तालयाला ७२०कर्मचारी देण्यात येणार आहेत. दुसNया टप्यात आणखी ७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यामध्ये आयुक्तालयाला कर्मचारी देण्यात येतील, अशी माहितीगृहमंत्री वळसे-पाटील यांनी