breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्विमिंग पूलबाहेर येताच ओल्या अंगाने लाईटला स्पर्श, लोणावळ्यात १३ वर्षांच्या मुलाचा करुण अंत

लोणावळा : जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटून बाहेर आल्यावर ओल्या अंगाने तलावाच्या कडेला असलेल्या लाईटला हात लावणं बालकाच्या जीवावर बेतलं. मुंबईतील एका १३ वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पुणे जिल्ह्यात लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंन्ट बंगल्याच्या जलतरण तलावात घडली. लोणावळ्यात जलतरण तलावात अशाप्रकारची १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हरुन मसुद वाली (वय-१३, रा. भायखळा, मुंबई ) असे जलतरण तलावाच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोहमद साजीद खान (वय- ५६, रा . भायखळा, मुंबई ) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहमद खान व त्यांचे नातेवाईक हे लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील क्रेसेंन्ट व्हिला या बंगल्यात गुरुवारी दुपारी आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास खान व त्यांच्या बहिणींची मुलं ही या बंगल्याच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटत खेळत होती. त्यावेळी हरुन याने खेळता खेळता जलतरण तलावाच्या पाण्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या एका विजेच्या खांबाला पकडले.

यावेळी त्याला विजेचा जोराचा धक्का लागला आणि तो मोठ्याने ओरडला, त्याचा थरकाप होऊ लागला. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी त्याला ओढून बाजूला केले, परंतु तो बेशुद्ध झाला होता. हरुनला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खबर दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.

लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील बंगल्याच्या जलतरण तलावात घडलेली ही अवघ्या १५ दिवसातील दुसरी घटना आहे. पंधरा दिवसापूर्वीच १३ जुलैला याच परिसरात एका दोन वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे लोणावळा शहरातील खाजगी बंगल्यांमध्ये असलेल्या अधिकृत व अनधिकृत असलेल्या जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांना कारणीभूत असलेल्या अधिकृत व अनधिकृत जलतरण तलाव व त्या संदर्भातील गोष्टींची लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषदेने तपासणी करून संबंधित अनधिकृत जलतरण तलाव नष्ट करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी लोणावळेकर नागरिक करत आहेत .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button