देशात ३९ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर, ३५ हजार रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली – गेल्या २४ तासांत देशात ४० हजारांहून कमी कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांत रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३९ हजार ९७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ५४६ मृतांची नोंद झाली आहे. तर, ३५ हजार ८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात हाहाकार माजला होता. या दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. आरोग्य व्यवस्था कोलमडली. वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशातील आकडेवारी पाहता दुसरी लाट अटोक्यात असल्याचं चिन्ह आहे. सध्या देशात ४ लाख ०८ हजार ९७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ०१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.