breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

10 हजार पोलिसांची होणार भरती, मात्र 2018 च्या प्रतीक्षा यादीत असलेल्या 1500 ते 2000 उमेदवारांचे काय?

सध्या पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवतेय..तसचं कोरोनामुळे 50 वर्षांच्या वर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्यात आली आहे. हीच कमतरता भरून काढण्यासाठी दहा हजार पोलीस भरतीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. मात्र 2018 साली प्रतीक्षा यादीत असलेल्या 1500 ते 2000 उमेदवारांचे काय? हा प्रश्न गेल्या 2 वर्षांपासून तसाच प्रलंबित आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात 10 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षातून एकदा पोलीस भरती होत असते, मात्र 2018 नंतर 2019 मध्ये आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमाने अर्ज भरून घेण्यात आले, मात्र भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सध्या पोलीस दलात असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी दहा हजार पोलीस भरतीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. मात्र 2018 साली प्रतीक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) असलेल्या 1500 ते 2000 उमेदवारांचे काय? हा प्रश्न गेल्या 2 वर्षांपासून अनुत्तरीतच आहे.

गेली दोन वर्ष या उमेदवारांकडून पोलीस दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. प्रसाद पवार यांनी सांगितलं की 2018 मधील उमेदवारांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांची फक्त आरोग्य चाचणी (मेडिकल) बाकी आहे. ज्यानंतर ते पोलिस सेवेत रुजू होऊ शकतात. तर दुसरीकडे ज्या 10 हजार पोलीस भरती निघणार आहेत. त्यांची पूर्ण प्रक्रिया सरकारला पहिल्यापासून राबवावी लागेल. ज्याला खूप वेळ जाऊ शकतो आणि खर्चही लागणार आहे. म्हणून जर 2018 मधील वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पोलिस दलात रुजू केलं गेलं तर त्यामुळे सरकारचा पैसा आणि वेळही वाचेल. या 10 हजार भरत्या टप्प्या-टप्प्याने होणार असून याचा कालावधी निश्चित नाही.

तर राकेश माने यांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव कधी संपेल माहीत नाही. जसं शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरकार घेत नाहीय तर मग भर्ती कशी करणार? दुसरीकडे पोलिसांच्या ज्या मैदानात भर्ती प्रक्रिया किंवा मैदानी परीक्षा घेतल्या जातात त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. अशा परिस्थितिमध्ये परीक्षा घेणार कशी? हा मोठा प्रश्न आहे.

सुरुवातीला कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता काम करण्याची तयारी उमेदवारांनी दाखवली असून सरकारने यांच्या भर्ती संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा ही अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button