breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंदी

मुंबई – यंदा पावसाळा लवकरच असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने 1 जून ते 31 जुलै 2018 असे दोन महिने राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत मासेमारी बंदी घोषित केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मच्छिमारांना आता आपल्या बोटी किनाछयावरच शाकाराव्या लागणार आहे. पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते.

मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने 1 जूनच्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या 22 फेब्रुवारी 2018 च्या आदेशानुसार ही मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button