होय, मी पण नेमबाज आहे पण राजकारणातला – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
होय, मी पण नेमबाज आहे पण राजकारणातला. राजकारणात कहीं पे निगाहे, कही पे निशाणा ठेवावा लागतो. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे 13 व्या अखिल भारतीय नेमबाज स्पर्धेचा पुण्यात आज समारोप झाला. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उप-सभापती नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत 27 संघ आणि 560 पोलीस नेमबाज स्पर्धेत सहभागी झाले. यावेळी विजेत्या नेमबाजांना पहिल्यांदाच शुद्ध चांदीची पदकं प्रदान केली जाणार आहेत.
ठाकरे म्हणाले की, तुमचा ज्या ठिकाणी निशाणा आहे तिथेच असतो. तुमचा नेम कधीच चुकत नाही”, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अवघ्या देशातून साडेपाचशे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आपण विविध राज्यातून आलेला आहात. मला तर वाटत हिंदुस्थाना मधील प्रत्येक पोलिसांचा निशाणा योग्य लागला पाहिजे. पोलिसांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे आणि ती आम्ही घेऊ.” तसेच तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी…तुमचा विजय निश्चीत आहे अशा शब्दांत विजेत्या स्पर्धकांचं त्यांनी मनोधैर्य वाढवलं आहे.