breaking-newsराष्ट्रिय
हा मोदींचा ‘निर्दयी न्यू इंडिया’ : राहुल गांधी यांची अलवर प्रकरणी प्रतिक्रिया
अलवर येथे अकबर खान नामक तरुणाचा गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी जमावाद्वारे निर्घृण खून करण्यात आला होता. देशभरामध्ये जमावाद्वारे करण्यात येणाऱ्या क्रौर्याच्या घटना वाढीस लागलेल्या असून हाच मोदींच्या स्वप्नातील ‘निर्दयी न्यू इंडिया’ असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी एका वृत्ताचा दाखला देत पोलिसांनी जमावाने जबरदस्त मारहाण केल्याने मरणशय्येवर असलेल्या पीडित व्यक्तीस दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यास ३ तास लावले असं देखील म्हंटंल आहे.
ट्विटर द्वारे व्यक्त होताना राहुल गांधी यांनी अलवर प्रकरणारून चांगलेच घेरले आहे दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये देखील राहुल गांधींनी मोदींवर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.