पुणे

सुंदर व निरोगी त्वचेसाठी सकस आहाराची गरज-  डॉ. सुहास माटे                         

निगडी –  सुंदर व तजेलदार त्वचेमुळे आपले व्यक्तीमत्व प्रभावशाली बनते. आपल्याला त्वचा संवेदनांची जाणीव करुन देतानाच पुर्ण शरीराचे वातावरण व विविध आघातांपासून संरक्षण करीत असते.  आपली  त्वचा  निरोगी  राखणे आवश्यक असुन यासाठी सकस व चौरस आहार घेणे आवश्यक आहे, असे मत त्वचारोग तज्ञ डॉ. सुहास माटे यांनी व्यक्त केले.

निगडी येथील इंडियन असोशिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने  जागतिक त्वचा आरोग्य दिनानिमित्त आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. माटे पुढे  म्हणाले की, त्वचेचे विविध प्रकार असुन ऋतुमानानुसार व वातावरणातील बदलानुसार गरज असेल तरच सौंदर्यप्रसाधने वापरली पाहिजेत. अनेक प्रकारच्या क्रिम, लोशन, शॉम्पू, साबण यामध्ये स्टीरॉईड व रसायने वापरलेली असतात. त्यांच्या दिर्घ वापरामुळे दुष्परिणाम होऊन त्वचेची हानी होऊ नये. म्हणून खोट्या जाहीरातींना बळी न पडता तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने त्वचेची स्वच्छता राखणे गरजेचे असून स्वच्छ व सुती कपडे वापरावेत. यावेळी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केसांची निगा, आहार, विविध प्रकारच्या त्वचा विकारांची माहिती त्यांनी  उपस्थितांना दिली.
 सावरकर मंडळाच्या शिल्पा बिबीकर यांनी  प्रास्ताविक केले.  विनीता श्रीखंडे यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button