साईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; पाथरीकरांना निमंत्रण नाही
शिर्डी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. काल संध्याकाळी शिर्डीत पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिक आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
या चर्चेत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. तसेच आज शिर्डीकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जाणार असले, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचं निमंत्रण नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद मिटणार की नाही, हे आजच्या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बंद मागे घेतला असला तरीही वाद अद्याप मिटलेला नाही. तसेच या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे.