ताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सहिष्णुता व संवेदनशीलता हीच ताकद!
बजाज म्हणाले की, आत्ता देशात उघडपणे न बोलण्याचे वातावरण आहे; पण नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर हाच मुद्दा उपस्थित केला होता. देशात १०० लोक बोलण्याचे धाडस करत नसतील तर त्यापैकी ९० लोकांकडे लपवण्याजोगे काही तरी आहे. काही लोकांना उघडपणे बोलायचे नसते, कारण त्यानंतर उद्भवू शकणाऱ्या प्रतिक्रियांना त्यांना सामोरे जाण्याची हिंमत नसते. तुलनेत मीही याच श्रेणीत येतो. म्हणून तर मी समाजमाध्यमांवर नाही. सहिष्णुता व संवेदनशीलता ही आपल्या देशाची ताकद असून ती आपण गमावू नये!