breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

सहस्त्रकुंड धबधब्यात मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या

नांदेड – मालमत्तेच्या वादातून हदगाव तालुक्यातील एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण कवानकर यांनी पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींसह यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली. कवानकर कुटुंबांतील दोन भावांतील मालमत्तेचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरू होता. दरम्यान, ५ जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा अजूनही शोध लागलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

प्रवीण भगवानराव कवानकर (४२), त्यांच्या पत्नी अश्विनी प्रवीण कवानकर (३८), मोठी मुलगी सेजल कवानकर (२०), दुसरी मुलगी समीक्षा (१४) व लहान मुलगा सिद्धेश (१३) अशी मृतांची नावे आहेत. प्रवीण कवानकर, अश्विनी कवानकर, सिद्धेश यांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. समीक्षा आणि सेजल यांचे मृतदेह सापडले नाहीत.

कवानकर कुटुंब दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेऊन सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. कवानकर कुटुंबीयांनी मेहुणा येत आहे, असे सांगून त्यांनी वाहन परत पाठवले. विदर्भाच्या बाजूने असलेल्या मुरली गावानजीक धबधब्यात गुरुवारी पाचही जणांनी उड्या मारून जीवनयात्रा संपविली. प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक तर मुलगा सिद्धेश व अश्विनी यांचे प्रेत दराटी परिसरात आढळून आल्याची माहिती आहे. भगवानराव कवानकर हे कवाना ता. हदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी, हदगाव येथे त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता. हा वाद टोकाला पोहोचला. या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्रवीण यांनी कुटुंबासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून सर्वांना संपविले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button