breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सरपंचपदाच्या लिलावाच्या घटनेची गंभीर दखल, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

मुंबई – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सरपंचपदासाठी लिलाव होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. लोकशाहीसाठी मोठा धक्का असणाऱ्या या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

या लिलावांच्या घटनांबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

राज्यात काही ग्रामपंचायतींमध्ये संरपंचपदाच्या झालेल्या लिलावाचे व्हिडिओ समोर आले होते. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारीही आल्या होत्या. अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचा चक्क लिलाव करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा. हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्याची परवानगी मागतानाच सादर करावा, असे मदान यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button