breaking-newsपिंपरी / चिंचवड

सरकारने जनतेला सोडले वाऱ्यावर, भाजपकडून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक १ वर पोहोचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची दयनीय अवस्था झाली आहे.

राज्यात प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याची आणि राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाचा पिंपरी-चिंचवड शहर भाजपने निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही शहर भाजपने केली आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button