संविधानाच्या संरक्षणाची गरज- सचिन साठे
पिंपरी |
स्वतंत्र भारताच्या इतिहासात संविधानाबाबत आणि शेतक-यांबाबत एवढी उदासिनता कोणत्याही सरकारने दाखविली नाही. पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी असल्यामुळे तेही शक्य झाले असल्याची टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन साठे यांच्या हस्ते आकुर्डी प्राधिकरणात ध्यवजारोहन करण्यात आले. यावेळी साठे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे आणि शाम अगरवाल, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, हरीदास नायर, भाऊसाहेब मुगूटमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, युवक कॉंग्रेस सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, मेहताब इनामदार, विश्वनाथ खंडाळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, ॲड. अनिरुध्द कांबळे, शोभा पगारे, विशाल कसबे, संदेश बोर्डे, स्नेहल गायकवाड, निता चामले, प्रतिभा कांबळे, ऋषिकेश थोरात, शैलेश अनंतराव आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, दिल्लीतील सीमांवर देशभरातील शेतकरी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. शेतक-यांचे हक्क डावलून हूकूमशाही पध्दतीने पंतप्रधान मोदी यांनी अन्यायकारक नविन कायदे केले. देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन आणि दिर्घकाळ चालणारे हे आंदोलन आहे. हे आंदोलन अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. आपल्या संविधानीक हक्कांसाठी लढणा-या आंदोलकांवर अशा प्रकारे अन्याय करणा-या सरकारला आता देशभरातील नागरीक रस्त्यावर उतरुन जाब विचारल्या शिवाय राहणार नाहीत असेही सचिन साठे म्हणाले आहेत.
वाचा- कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु असणाऱ्या सिंधू सीमेवरील सुरक्षेमध्ये वाढ