breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
संकट काळातही कर्तव्य पार पाडण्याचा खासदारांचा निर्णय- पंतप्रधान
नवी दिल्ली: एका विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. कोरोनाही आहे, कर्तव्यही आहे. कोरोना काळात कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय सर्व खासदारांनी घेतलेला आहे. त्याुमुळे या सर्व खासदारांचे मी आभार मानतो आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरनामुळे मध्येच स्थगित करण्यात आलेले होते. याही वेळा अधिवेशनाची वेळ बदलण्यात आलेली आहे. या सत्रातही विविध विषयांवर चर्चा होईल. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी, विविध विषयांवर सखोर चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाईल.