शेतकरी मोर्चा आज राजभवनावर जाणार, आझाद मैदानात शरद पवारही लावणार हजेरी
मुंबई – शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात आज(२५ जानेवारी) होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले.शेतकरी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले. आझाद मैदानात उद्या सकाळी जाहीर सभा होईल. या सभेत डाव्या पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता मोर्चा राजभवनकडे कूच करेल. राजभवनावर जाण्याचा निर्धार कायम असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले आहे.