breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष : बाळासाहेब थोरात

मुंबई | केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. या काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेसच्या #SpeakUpForFarmers या ऑनलाईन मोहिमेला उदंड प्रतिसाद, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत संघर्ष सुरुच राहिल असे ते म्हणाले.

कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत केले. कृषी विषयक आणि कामगारांबाबतची विधेयके मंजूर करुन घेतली. केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये आणि संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगून शेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत संघर्ष सुरुच राहिल, असा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. आज राज्यभरात #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button