breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवविचारांचे अनुकरण केल्यास भारत देश विश्वगुरू – राहुल पाखरे

– सदानंद तरुण मित्र मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी । प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांच्या विचाराचे अनुकरण अंगीभूत केल्यास कोणतीच शक्ती आपल्याला अपयशी करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हि विचारांची असली पाहिजे, जी वर्षभर आपल्या घरात जिजाऊ आणि शिवाजी घडण्यासाठी सत्कारणी लागली पाहिजे. देशातील प्रत्येकाने शिवतंत्र आणि शिवविचारांचे अनुकरण केल्यास भारत देश विश्वगुरू होऊ शकतो असे प्रतिपादन शिव अभ्यासक राहुल पाखरे यांनी केले.

शिवजयंती निमित्त पिंपरी, खराळवाडीतील सदानंद तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाखरे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात अतुल दाभोळकर, बन्सी बहारे, रोहन ववले, दिपक जाधव, सचिन सकपाळ, रवी कांबळे आदींनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button