विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश यांच्यासह तब्बल ४५ जणांची बदली…
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश असेल जारी झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहानंतर राज्यातील ४५ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये मुख्यत: नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
तर विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सही केल्यानंतर हे आदेश निघाले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विश्वास नांगरेंच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.