breaking-newsक्रिडा

विश्वचषकाचा इतिहास म्हणतो, ‘अंतिम सामना रंगणार या संघांमध्ये’

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतची मंगळवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरूवारी यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. राऊंड रॉबिन लीग पद्धतीनुसार झालेल्या ४५ सामन्याची साखळी फेरी शनिवारी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याने संपली. यातून गुणानुक्रमे भारत(१५ गुण), ऑस्ट्रेलिया (१४ गुण), इंग्लंड (१२ गुण) आणि न्यूझीलंड (११ गुण) यांनी अव्वल चार संघात स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत पोहचलेल्या चारही संघाचा विश्वचषकचा इतिहास तपासल्यास अंतिम फेरीतील संघ कोणते असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.

१९७५ पासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली, तेव्हापासून आजतागत क्रिकेट विश्वावर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येते. ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत ८ वेळा उपांत्य फेरीत पोहचला आहे. यापैकी सात वेळा या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तर दोन वेळा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्यांची लढत यजमान इंग्लंडशी होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button