breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ध्यातील टिळक बाजाराला भीषण आग

वर्धा – शहरातील टिळक मार्केट परिसरात असलेल्या भाजी बाजार नावाने प्रसिद्ध असलेल्या गोल बाजाराला आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. याची माहिती नागरिकांना मिळताच आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता भाजीविक्रीची संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,46,777 वर

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दहा वाजेपर्यंतही आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे दाखल झाले, त्यांनी संपूर्ण पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच इतर दुकाने खाली करण्यास सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button