breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने पाच आमदारांना नारळ

  • कारवाईचा बडगा लवकरच होणार – अशोक चव्हाण

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पक्षही बंडखोरी केलेल्या आमदारांवर त्याचप्रामणे पक्षविरोधी काम केलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मुंबईत आज (१० मे) झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे या ५ जणांचा यात समावेश होतो. या पाचही जणांनी निवडणुकांच्या काळात भाजप-शिवसेनेचा प्रचार केला.

यापैकी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला असून तो काँग्रेसने स्वीकारला आहे. तर अब्दुल सत्तार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, इतर बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कॉंग्रेसच्या या पाचही आमदारांवर कारवाई करण्यात येईल. तसेच लोकसभेच्या त्या त्या मतदारसंघातील उमेदवारांकडून याबाबत अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर या पाच आमदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. उदा. राधाकृष्ण विखे-पाटील यांचाबाबतचा अहवाल कॉंग्रेसचे शिर्डीचे उमेदवार भाउसाहेब कोळंबे आणि अहमदनगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडून मागविण्यात येईल.

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याबाबतचा अहवाल औरंगबादचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडून मागविला जाईल. आमदार कालिदास कोळंबकर यांचा अहवाल दक्षिण मध्य मुंबईचे कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्याकडून मागविला जाईल. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचा अहवाल रत्नागिरी सिंधुदुर्गचे कॉंग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदोडकर यांच्याकडून तर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अहवाल माढाचे कॉंग्रेस उमेदवार संजय शिंदे यांच्याकडून मागविला जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button