breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लसीकरणापर्यंत मास्क कोरोना नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी – गौतम कोतवाल

पुणे | प्रतिनिधी

कोरोनाचा सध्या प्रभाव कमी होत असला तरी लसीकरण पुर्ण होईपर्यंत मास्क वापरणे हे अत्यंत आवश्यक आहे. मास्क मुळेच कोरोनाचा प्रसार नियंत्रित होवू शकतो असं मत युवा अस्मिता संस्थेचे राज्याचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी व्यक्त केलं. युवा अस्मिता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्वती पायथा येथे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मास्कचं वाटप करण्यात आलं, या कार्यक्रमात ते बोलत होते.

मास्कचे वाटप माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक प्रसन्न जगताप, सुनिल चांदेरे व युवा अस्मिता संस्थेचे प्रमुख बाबु नाईक, भुषण येळकर, संदिप गाडे, भारती गोळे, सोनी गोडसे, वैष्णवी जाधव, उमेश बोरगावकर, राजेंद्र भोसले, मंजू वाघमारे, नीता मुधाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

युवा अस्मिता संस्था गेली 30 वर्षे युवकांना दिशा देण्याचं काम महाराष्ट्रभर सातत्याने करत आहे. कोरोना काळातही संस्थेने अनेक विस्थापित कामगारांना जेवणाची सोय केली होती. पर्वती पायथा येथील झोपडपट्टीतील लोकांना मास्कचं वाटप करून संस्थेने आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याचा आपला यज्ञ चालु ठेवला आहे असे प्रतीपादन मा. उपमहापौर, नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी या वेळी व्यक्त केले. लुपीन फाऊंडेशनने या कार्यक्रमासाठी मास्क पुरवले. कार्यक्रमाची सांगता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्तचा केक गौतम कोतवाल यांच्या हस्ते कापून झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button