breaking-newsराष्ट्रिय

‘रोहिंग्या’ची होणार घरवापसी ?

नवी दिल्ली : रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या रोहिंग्यांना सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणापर्यंतच मर्यादित ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांना दिले आहेत.

म्यानमार सरकारला रोहिंग्यांची माहिती केंद्र सरकार देणार आहे. नेमकी निर्वासितांची संख्या व इतर माहिती जमा करण्यासाठी केंद्राने राज्याला निर्देश दिले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीरच्या गृहसचिवांना पाठवलेल्या पत्रानुसार, अवैधरीत्या देशात राहणारे रोहिंग्या निर्वासित बनावट पॅन कार्ड, बनावट मतदार ओळखपत्र, मनी लॉड्रींग आदी बेकायदेशीर कृत्यांमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button