breaking-newsराष्ट्रिय
रेल्वेने लावली तेरा लाख झाडे
नवी दिल्ली– भारतीय रेल्वेने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 1300 किमीच्या रेल्वे मार्गाच्या बाजुला 13 लाख 26 हजार झाडांचे रोपण केले आहे अशी माहिती आज अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. स्वच्छताही ही सेवा पखवाडा या उपक्रमाअंतर्गत हे काम करण्यात आले आहे. या उपक्रमा अंतर्गत स्वच्छ स्टेशन, स्वच्छ नीर, स्वच्छ परिसर, स्वच्छ संवाद आणि स्वच्छ अवेअरनेस असे उपक्रम राबवण्यात आले. गांधी जयंतीच्या निमीत्ताने गांधीजींशी संबंधीत रेल्वे स्थानकांवर त्यांच्याशी संबंधीत प्रसंगाची चित्रे रेखाटण्यात आली होती. याच पंधरवड्याच्या निमीत्त रेल्वे मार्गाच्या कडेने लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या मोहीमेला चांगला प्रतिसाद लाभला. त्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच बऱ्याच ठिकाणी स्थानिक नागरीकही सहभागी झाले होते.