breaking-newsमहाराष्ट्र

राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी

मुंबई : राज्यामध्ये विविध शहरात अचानक टाळेबंदी घोषित होण्याच्या पद्धतीमुळे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांत बेबनाव आहे. त्यानंतरही ज्या पद्धतीनं राज्यामध्ये टाळेबंदी लावली जात आहे, त्यावरून शरद पवारही नाराज असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. चर्चेत इथून पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधींना न विचारता टाळेबंदी घोषित करू नयेत अशा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्याचं कळतंय.

कधी औरंगाबाद, कधी मुंबई, कधी ठाणे, कधी अक्कलकोट, कधी बीड तर कधी आणखी कोणत्या तरी शहरात अचानक टाळेबंदी घोषित झाल्याच्या बातम्या गेल्या चार दिवसांत येत आहेत.

स्थानिक पातळीवरची टाळेबंदी घोषित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकारी महसूल यंत्रणेचे प्रमुख. ही महसूल यंत्रणा इतर विभागाच्या समन्वयासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. सुरुवातीपासून टाळेबंदी जाहीर करत असताना मनमानीच्या गोष्टी घडल्या. राज्यात अनेक ठिकाणी टाळेबंदी लावताना समन्वय समितीच्या बैठकाच घेतल्या गेल्या नाहीत. मुंबईत दोन किलोमीटरच्या क्षेत्रातच नागरिकांनी वावर ठेवावा, असं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पत्रक काढले. ज्याची गृहमंत्र्यांनाच माहिती नव्हती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button