breaking-newsमहाराष्ट्र

राज्यात ‘कोसळणार’च; अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात २०० मिलीमीटर इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि गोव्यामध्ये ५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते. तर मध्य महाराष्ट्रात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून ५ जुलैनंतर पाऊस कमी होत, जाईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button