breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १६ हजारांपेक्षा जास्त ३०९४ ठणठणीत

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. तर ३०९४ जण ठणठणीत बरे झाले आहेत. काल दिवसभरात १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज साताराऱ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. कराडमध्ये दोघांना तर साताऱ्यातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर औरंगाबादमध्ये १७ रुग्णांचा वाढ झाली आहे.

रत्नागिरीतही कोरोनाचा आकडा वाढला आहे. हा आकडा १७ च्या घरात पोहोचला आहे. नागपुरात ४४ ने आकडा वाढला आहे. तर येवला येथे दोन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.राज्यात काल १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, असे असले तरी मालेगाव, औरंगाबाद, नागपूर आणि ठाणे, नवी मुंबई येथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये कोरोना साखळी मोडण्यात म्हणावे तसे यश येत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button