breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येत राजकारण करावे – संजय राऊत

पुणे – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर थेट टीका केली आहे. गेले अनेक दिवस राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात हिंदुत्वावरुन वाद सुरुच आहे. यावरुन संजय राऊत यांनी आज असेही म्हटले की शिवसेनेचा हिंदुत्व शिकवू नये. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावरुनही राऊत यांनी राज्यपालांची भेट घेत महाराष्ट्राचा अपमान केला असेही म्हटले.

इतकेच नव्हे तर, “राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाही आहेत हे सगळ्यांना माहित आहे. मात्र, राज्यपाल काही दाखवू शकत नाही. ते जनता ठरवेल. राज्यपालांसाठी राजभवन ही एक उत्तम जागा आहे. त्यांचा सगळा खर्च शासकीय तिजोरीतून होतो. फक्त नेमणूक केंद्राकडून होते, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्यपालांना सुनावले आहे. इतकेच नव्हे तर राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येऊन राजकारण करावे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. राजभवन हे राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन सोडून मैदानात या आम्ही राजकारण करु. राजभवनाच्या प्रतिष्ठेचा आणि जी घटनात्मक जागा आहे तिचा सन्मान करतो”, असे म्हणत राज्यपालांना आव्हान दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button