breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रस्त्यावर अखेर मुंबईकरांची गर्दी
राज्य सरकारने खासगी, सरकारी कार्यालयांतील उपस्थितीविषयी आदेश देताच सोमवारपासूनच मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. अनलॉक- १च्या पहिल्याच दिवशी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली तर, हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्यात. काही ठिकाणी पहिल्याच दिवशी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचं पहायला मिळालं.
कार्यालये सुरू झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने बसफेऱ्यांची घोषणा केली. मात्र, महामार्गावर काही बस न थांबताच निघून जात आहेत. त्यामुळं प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. तर, खूप वेळानंतर बस आल्यामुळं बस पकडण्यासाठी गर्दी करण्याचे प्रकारही घडत आहेत. परिणामी अनलॉक-१च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसत नाहीये.तसंच प्रवाशांच्याही लांब लांब रांगा लागलेल्या पहायला मिळतायत.