येत्या 24-48 तासांत मुंबईसह,ठाणे, रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईसह , ठाणे, पालघर , रायगडसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा हा जोर पुढील 2-3 दिवस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई, ठाणे, रायगड मध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय सोलापुर , लातुर मध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. कोकणात दिवसभर पावसाची संततधार असेल मात्र रात्री मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकणातील अंतर्गत भागात अधिक पाऊस होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नद्या व धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना या तिन्ही धरणांमधून जवळपास 45 हजार क्यूसेक विसर्ग केला जाणार आहे. तसेच सध्या अलमट्टी धरणामधून विसर्ग सुरू आहे, पण जर पाऊस वाढला तर स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. रायगड आणि कोकण भागातही अनेक नद्यांंच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.