breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

युती न झाल्यास शिवसेनेचाच तोटा- मुख्यमंत्री

मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढण्याचा विचार करत आहेत. परंतु दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यास याचा अधिक तोटा शिवसेनेलाच होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. परंतु, याचा अधिक तोटा शिवसेनेला होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढली तर मतांचे विभाजन होईल आणि याचा दोन्ही पक्षांना तोटा होईल. त्यामुळे युती करण्यातच दोन्ही पक्षाचा फायदा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. स्वबळावर लढल्यास आमचा दोन-तीन जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती रहायला हवी असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button