breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

‘या’ दिवसापासून सुरू होणार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष; सरकारचा निर्णय झाला!

मुंबई | प्रतिनिधी

कोरोनामुळे २०२० चे शैक्षणिक वर्ष पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकाल आता ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष पुन्हा बसविण्याच्या हेतूने नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर १ डिसेंबरपासून २०२१-२२ चे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे.

दिवाळी, उन्हाळी सुट्या रद्द करून विद्यार्त्यांना शिकविले जाणार असून वेळेत परीक्षा पार पाडण्याचे नियोजन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी उन्हाळी, दिवाळी अशा एकूण दोन ते अडीच महिने सुट्या दिल्या जातात.

नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरवात करण्याचे नियोजन आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्व सुट्या कमी करून अध्यापन करावे लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

कोरोनाच्या संकट काळात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तोंडी प्रश्‍न, ऑनलाइन असायन्मेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button