breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

…म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून मागार घेतली – पार्थ पवार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मी लोकसभा निवडणूक लढणार हे अधिच ठरलेलं होतं. केवळ साहेबांना सांगणं बाकी राहिलं होतं. ज्यावेळी हे साहेबांना कळलं त्या दिवशी त्यांनी स्वतः लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला आहे.

महाराष्ट्रातील एका मराठी वृत्तवाहिनीला पार्थ पवार आज मुलाखत देत आहेत. त्यांनी मुलाखत देताना हा खुलासा केला आहे. पार्थ म्हणाले की, मावळ मधून मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांचीच  इच्छा होती. त्यांनीच माझी उमेदवारी घडवून आणली आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी निवडणूक लढविण्यासाठी तयार झालो.

बेरोजगारी हा माझा मुख्य विषय असेल. मावळ मतदार संघात रोडझोन, रेल्वेचा विषय, कोळी समाजाचा विषय, माथाडी कामगारांचा विषय असे अनेक गंभीर विषय आहेत. परंतु, मी बेरोजगारीवर काम करणार आहे. भाजप सरकारणं दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवलं आहे. त्यामुळे मी नोकरी या विषयावर काम करणार आहे, असेही पार्थ म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी भव्य व्यासपीठावर साहेब, दादा आणि अथांग जनसागर यांच्यापुढे माझा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे मी ठिकपणे बोलू शकलो नाही. कारण, मला राजकारणात माझ्या आत्याच सल्ले देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तयारी करत असतो, असेही पार्थ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button