breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

…म्हणून राज्यभरातून पदाधिकाऱ्यांना बोलावलं : राज ठाकरे

पुणे | महाईन्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संवाद शिबीराला पुण्यात सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही कार्यक्रमस्थळी पोचलेले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिबीराचा उद्देश स्पष्ट केला आहे. मागच्या दीड महिन्यात जो बिन पैशांचा तमाशा झाला, त्याविषयी पदाधिकाऱ्यांकडे काय आऊटपुट्स आहेत ते विचारायला त्यांना बोलावलेलं आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकींनंतर ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला नव्हता व त्यातच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला ठाकरे यांनी पाठिंबा आणि विरोध न करता तटस्थ भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची पक्षांतर्गत आणि राजकीय भूमिका काय आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. अखेर भूमिका स्पष्ट करणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याकरिताच आजपासून ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button