मोदी मंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर
नवी दिल्ली – कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काल (१७ सप्टेंबर) मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला. दरम्यान, हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
“शिरोमणी अकाली दल या विधेयकाचा तीव्र विरोध करते. देशासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रत्येक विधेयकाचे देशातील काही लोक समर्थन करतात तर काही त्याला विरोध करतो. सरकारच्या नव्याने येणाऱ्या ३ कायद्यांचा पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे.कृषी बाजारातील ३ लाख मजूर आणि २० लाख शेतीतील मजूरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे”, असे बादल यांनी म्हटले आहे.
पत्रात त्यांनी काय म्हटले आहे?
– शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही.
– शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा आहे.
– पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे.
– तीन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहेत.
– शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहे.
तीन विधेयक संसदेत मंजूर
– पहिलं विधेयक – कृषी क्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य
– दुसरे विधेयक – शेतकरी किंमत हमी आणि कृषी सेवा करार आणि
– तिसरे विधेयक – अत्यावश्यक वस्तू