‘मॅडम, तुम्ही कांदा खात नसाल तरी अर्थव्यवस्था नक्कीच खाल्लीय’; सीतारमन यांच्यावर सामान्य जनता भडकली
महाईन्यूज | दिल्ली
ससंदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी कांद्याच्या दरवाढीवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचे उत्पादन का घटले आणि त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संसदेमध्ये विचारला.
देशभरात कांद्याच्या किंमतीनं शंभरी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना सीतारमन यांनी “मी अशा कुटुंबातून आहे जिथे जास्त कांदा आणि लसूण खाल्ला जात नाही,” असं अजब वक्तव्य त्यांनी केले. सितारमन यांच्या या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.कांदा दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र अर्थमंत्री म्हणून सीतारमन यांचे वक्तव्य हे संवेदनशून्य आणि सत्तेचा माज दर्शवत असणारे आहे अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे. अनेकांनी या मुद्द्यावरुन त्यांना ट्रोल केले असून तुम्ही कांदा नाही तर देशाची अर्थव्यवस्थाच खाल्ल्याचा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
- तुम्ही कांदा नाही अर्थव्यवस्था खाल्ली
- अर्थव्यवस्थेची काळजी नाही कारण…
- जीडीपी खाल्लारे