मुळा धरण 80 टक्के भरले
राहुरी – नगर जिल्ह्याची जलसंजीवनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 21 टीएमसीवर पोहोचला आहे. मुळा धरण 80 टक्के भरले आहे. गेल्या वीस- बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये पाचव्यांदा भरण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणाकडे कोतुळकडील मुळा नदीतून आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. आज सकाळी धरणाकडे लहीत खुर्द येथून सव्वा तीन मीटरला नऊ हजार 155 क्यूसेकने धरणाकडे वाहत होती. धरणात 24 तासात पाऊण टीएमसी पाणी जमा झाले आहे.
धरणसाठा 21 टीएमसीवर पोहोचला. पाण्याची पातळी 1 हजार 803 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात वाढ झाली असून या काळात धरणाच्या पाणी पातळीमध्ये साडेतेरा फुटांनी वाढ झाली आहे. मुळा धरण यापूर्वी वीस-बावीस वर्षांत ऑगस्टमध्ये चार वेळा ओव्हरफ्लो झालेले आहे. गेल्या वीस वर्षात अकरा वेळा धरण भरलेले नाही 2005, 2006, 2007 या तीन वर्षात ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन विसर्ग सोडण्यात आला होता. मुळा धरणाकडे पाण्याची आवक पाहता साडे पंचवीस टीएमसी साठा झाल्यानंतर केव्हाही धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते. ऑगस्ट महिना संपायला अजून दहा दिवस बाकी आहे, उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पाहता गणेशोत्सव काळात मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून मुळा लाभक्षेत्रातील राहुरी, नगर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यात सर्वांचे तसेच गणेश भक्तांचे देखील लक्ष लागलेले आहे. लाभक्षेत्रात आधीचे दोन महिन्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची विशेष हजेरी नव्हती, आता ती कसर भरुन निघत आहे. यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.धरणसाठा 21 टीएमसीवर पोहोचला. पाण्याची पातळी 1 हजार 803 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात वाढ झाली असून या काळात धरणाच्या पाणी पातळीमध्ये साडेतेरा फुटांनी वाढ झाली आहे. मुळा धरण यापूर्वी वीस-बावीस वर्षांत ऑगस्टमध्ये चार वेळा ओव्हरफ्लो झालेले आहे. गेल्या वीस वर्षात अकरा वेळा धरण भरलेले नाही 2005, 2006, 2007 या तीन वर्षात ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन विसर्ग सोडण्यात आला होता.