breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर’
नवी दिल्ली | देशापुढील मुख्य प्रश्नांपासून देशातील नागरिकांचे लक्ष वळविण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस, पंडीत जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान असे मुद्दे पुढे केले जात आहेत, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणावर गुरुवारी टीका केली.
नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडलेल्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी जुन्या काळातील काँग्रेस सरकारच्या काराभाराचे वाभाडे काढले. त्याचवेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काही संदर्भही दिले. या भाषणावेळी राहुल गांधी लोकसभेत उपस्थित होते. आपल्या भाषणात राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावरही नरेंद्र मोदींनी टीका केली.