breaking-newsमुंबई

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा आंदोलनाला हिंसक वळण, राजीनामा द्या : विखे-पाटील

मुंबई – मुख्‍यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्‍या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर विधाने करून मराठा समाजाच्‍या असंतोषात भर घातली, मराठा समाजाच्‍या आंदोलनाला हिंसक वळण लागण्‍यास राज्य सरकारचे वेळकाढू धोरण तसेच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिथावणीखोर वक्‍तव्‍ये कारणीभूत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्‍यभरात सुरू असलेल्‍या मराठा समाजाच्‍या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली.

राज्यभर शांततामय मार्गाने आंदोलनं केल्यानंतर सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखून आतापर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्णत्‍वास न्‍यायला हवी होती. पण हे सरकार मुळातच आरक्षणविरोधी आहे, त्यामुळे केवळ मराठाच नव्‍हे, तर मुस्लिम व धनगर समाजाच्‍या आरक्षणासंदर्भातही ते केवळ वेळकाढूपणा करत आहे. मराठा आंदोलन आक्रमक होत असल्यामुळे सरकारने सामोपचाराने आंदोलकांशी चर्चा करून आरक्षणाच्‍या पुढील कार्यवाहीसंदर्भात ठोस आश्‍वासन द्यायला हवे होते. मात्र, त्‍याऐवजी मुख्‍यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्‍या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर विधाने करून मराठा समाजाच्‍या असंतोषात भर घातली. योग्यवेळी मराठा आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्‍यामुळेच राज्‍यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्‍यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button