breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत 1 ऑगस्ट पासून शहरात 20 टक्के पाणी कपात; महापालिकेनं घेतला मोठा निर्णय

मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या म्हणजे 1 ऑगस्ट पासून शहरात 20 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्यासह त्याचा पुरेसा साठा करावा असं आवाहन करण्यात आलंय.. कारण तलावातील पाणीसाठी अत्यंत कमी झाला आहे. सध्या सात तलावातील जलसाठा फक्त 4.9 लाख मिलियन आहे. जो जलाशयाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा फक्त 35 टक्के ऐवढाच आहे. गेल्या वर्षात 30 जून पर्यंत 82 टक्के जलसाठा झाल्याचे ही सांगण्यात आलं आहे.

येत्या 1 ऑक्टोंबर पर्यंत सात तलावातील एकूण जलसाठी 14.5 लाख मिलियन व्हायला हवा. असे झाल्यास शहराला वर्षाअखेर पर्यंत पाणी कपातीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेण्यापूर्वी नागरी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत या निर्णयाची घोषणा केली आहे.

दरम्यान जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याचे दिसून आले. परंतु ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत कमी जलसाठा झाला आहे. तर तुळशी तलाव पाण्याने तुडुंब भरल्याचे दिसून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button