breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत १,१४५ पुण्यात २८४ नवे कोरोना रुग्ण, राज्यात ८९.८५ टक्के रिकव्हरी रेट

मुंबई – राज्यात शुक्रवारी ८ हजार२४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात शुक्रवारी १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून.सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button