मुंबईतील IFSC केंद्र गुजरातला नेण्याचा प्रकार दुर्दैवी – भुजबळ
मुंबई | शहरातील IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त करताना हा सगळा प्रकार १ मे या महाराष्ट्र दिन करणे हे दुदैवी आहे, अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता राज्य विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष पेटण्यास सुरुवात झाली आहे.
देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे विशेष महत्व आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. आजही मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला पोसते. एवढा व्यवहार मुंबईतून होतो. त्यामुळे महाराष्ट्र दिनीच हा प्रकार करणे हे दुर्दैवाचं आहे, अशी टीका अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.