breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मास्क न घालणाऱ्यां मुंबईकरांकडून ५२ लाख रुपयांचा दंड वसूल

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात राज्यात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देखील कारवाई तीव्र केली आहे. 20 एप्रिल ते 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 234 मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यात आलीय. यात तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. आता 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 (दोनशे रुपये) करण्यात आला आहे.

यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मुंबईत 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यामध्ये 200/- रुपये दंडाची रीतसर पावतीही नियम मोडणाऱ्याला देण्यात येत आहे. त्यामुळे ‘मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर 200 रुपये भरा!’ असा इशाराच पालिकेने या कारवाईतून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button