“मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा येईल” – स्वामी कृष्णस्वरुप दास
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा येईल असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दास यांनी केलं आहे. भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत. एवढंच नाही तर मासिक पाळीच्या काळात जी स्त्री स्वयंपाक करते आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल असंही वक्तव्य कृष्णस्वरुप दासजी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
“ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत”
” मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसं? ” असंही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं आहे…
एकीकडे देशभरात अंधश्रद्धा संपण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं जातय…