मुंबई

मानखुर्दमध्ये भडका : आंदोलनकर्त्यांनी बेस्ट बस पेटविली, जीवितहानी टळली

मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती समाजानं मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, अकोला आणि साताऱ्यात बंद पुकारला आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाज बंदमध्ये सहभागी होत रस्त्यावर उतरला आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.  मुंबई, ठाण्यात तर आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करुन प्रचंड नुकसान केले आहे.

 

मुंबईतील मानखुर्दमध्येही आंदोलकांनी बेस्ट बसवर दगडफेक करत पेटवून दिली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन बसला लावलेली आग विझवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button