महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार
पुणे | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जोरदार राजकारण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसंच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, महाराष्ट्र सरकार कधीही कुणाला घाबरत नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं.
रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात असलेलं कोणत्याही पक्षाचं सरकार कुणालाही घाबरत नाही हे आधी सर्वांनी लक्षात घ्यावं. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी शासन-शासन यामध्ये पाळावयाचा प्रोटोकॉल पाळला जावा असं वाटतं. मात्र, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावंच लागेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील.”
“सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणूक येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जातो आहे,” असंही रोहित पवार यांनी सांगितलं.